कोरोना: मुंबईतल्या या भागात पुन्हा लॉकडाऊन, रुग्णांची संख्या वाढली

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनानं मुंबईत थैमान घातलंय. त्यामुळे देशातील इतर राज्य-शहरांप्रमाणे मुंबईतही लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र तरीही मुंबईतील एकूण रुग्णांच्या संख्येनं एक लाखाचा टप्पा पार केलाय.
पाच लॉकडाऊन झाल्यानंतर 8 जूनपासून महाराष्ट्र 'अनलॉक' करण्यास सुरुवात झाली. मुंबईतल्याही काही भागात लहान-मोठी दुकानं उघडण्यास सुरुवात झाली खरी, पण काही भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागलीय.
मुंबईच्या उत्तर भागातील म्हणजेच, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या उपनगरांमधील काही भागात कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर वाढतच चालला असल्यानं, या भागात पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आलंय.

फोटो स्रोत, Getty Images
या भागात आता केवळ अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानंच सुरू राहतील. म्हणजेच, हॉस्पिटल, औषधांची दुकानं, किराणा इत्यादी जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व गोष्टी बंद राहतील.
उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी ही माहिती दिली.
मुंबईतल्या 'या' भागात पुन्हा लॉकडाऊन
- काजूपाडा (बोरिवली पूर्व)
- केतकीपाडा (दहिसर पूर्व)
- गणपत पाटील नगर (दहिसर पूर्व)
- पोईसर (कांदिवली पश्चिम)
- मढ आयलंड (मालाड पश्चिम)
- संतोष नगर (गोरेगाव)
- मालाड पश्चिममधील काही भाग
मुंबईतील कोणत्या भागात कोरोनाचा प्रसार वाढतोय, याची माहिती देणारा नकाशा मुंबई महापालिकेने जारी केलाय. त्याद्वारेही आपल्या लक्षात येऊ शकतं की, उत्तर मुंबईत कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर जास्त आहे.

फोटो स्रोत, BMC
R/C, P/N, R/N हे वॉर्ड उत्तर मुंबईतील आहेत.
उत्तर मुंबईतील अनेक भागात झोपडपट्ट्या सुद्धा आहेत. त्यामुळे या भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरजही अनेकांनी व्यक्त केलीय.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा - मुख्यमंत्री
आज पत्रकारांसोबत घेतलेल्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरे म्हणाले, "लोकमान्यांची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे पण ती सुरक्षित व्हायला पाहिजे. मी मुख्यमंत्री झाल्यावर एका पाठोपाठ वादळ संकटं येत आहेत... मी कुठल्याही वादळाला आणि संकटाला घाबरत नाही. आता आपली परीक्षा आहे. विघ्नहर्ताही आपल्याकडे पहात असतील की आपण काय शिकलो आणि कसं वागतोय.""गणेश मूर्तींची उंची हा प्रश्न आहेच. जर आपण उत्सव साधेपणाने करतोय तर मग गणेश मूर्ती संदर्भात आपण निर्णय घेतला पाहिजे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








