T20 वर्ल्ड कप फायनल नंतर ईशान किशनने बहिणीच्या मृत्यूविषयी काय सांगितलं?

व्हीडिओ कॅप्शन, T20 वर्ल्ड कप फायनल नंतर ईशान किशनने बहिणीच्या मृत्यूविषयी सांगितलं तेव्हा...
T20 वर्ल्ड कप फायनल नंतर ईशान किशनने बहिणीच्या मृत्यूविषयी काय सांगितलं?

टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात ईशान किशननेही अर्धशतक झळकावलं. ईशानने 25 चेंडूत 54 धावा केल्या. त्याच्या अर्धशतकामुळे भारताला 255 धावांपर्यंत मजल मारता आली.

सामन्यानंतर ईशानने आपल्या खेळीबद्दल भावनिक गोष्ट सांगितली. त्याने सांगितले की, अंतिम सामन्यापूर्वीच त्याच्या चुलत बहिणीचे निधन झाले होते, त्यामुळे तो खूप निराश झाला होता. ईशान किशनने ही खेळी आपल्या बहिणीला समर्पित केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)