You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुंदर दिसणारी जलपर्णी नद्या आणि तलावांसाठी का ठरतेय घातक? ग्राऊंड रिपोर्ट
तलावावर पसरलेली हिरवीगार जलपर्णी सुंदर दिसते. पण हीच जलपर्णी पाण्यातील जीवसृष्टीसाठी हानीकारक ठरतेय. नागपूरच्या अंबाझरी तलाव गेली तीन वर्षं जलपर्णीने व्यापलेला दिसतो. एकेकाळी दिसणारे मोठे मासे आता पाहायला मिळत नसल्याचं स्थानिक सांगतात. म्हणूनच लोकांनी हा तलाव वाचवण्यासाठी मोहीम उघडली आहे.
जलपर्णीची समस्या फक्त नागपूरपुरती मर्यादित नाही. तर कृष्णा, गोदावरीसारख्या नद्यांमध्येही जलपर्णी वेगाने पसरते आहे. सांडपाणी, प्रदूषण जिथे आहे तिथे जलपर्णीमुळे नदीचा प्रवाह खुंटल्याचं चित्र आहे.
जलपर्णीमुळे तलावातल्या जैवविविधतेची साखळी तुटते. तज्ज्ञ सांगतात, जलपर्णीचं जाळं सूर्यप्रकाश अडवतं, पाण्यातला ऑक्सिजन कमी करतं, माशांच्या अन्नसाखळीवर परिणाम करतं आणि माणसांसाठी घातक असं डासांची उत्पत्ती वाढवतं. जलपर्णीचं बीज तयार झालं की ते 20 ते 28 वर्षं तिथल्या इकोसिस्टममध्ये टिकून राहतं. त्यामुळे जलपर्णी जेसीबीने उपटून टाकण्याचे तात्पुरते उपाय पुरेसे ठरत नाहीत.
रिपोर्ट- भाग्यश्री राऊत
शूट- मनोज आगलावे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)